आरोग्यानामा ऑनलाइन टीम : प्रत्येक व्यक्तीने रक्तदान केले पाहिजे. कारण, आपल्याकडे सतत रक्ताची कमतरता भासत असते. रक्त ही एक गोष्टी आहे जी कृत्रिम पद्धतीने तयार केली जाऊ शकत नाही. अशाप्रकारे त्यास कोणताच पर्याय नसल्याने रक्तदान खुप महत्वाचे ठरते. रक्तदान केल्याने आपण अनेक लोकांचे प्राण वाचवू शकतो. मात्र, रक्तदान करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेवूयात.
या गोष्टींची घ्या काळजी
१ हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा अधिक असावा.
२ वजन ४५ किलो(महिला), ५५ किलो(पुरुष)
३ रक्तदान केल्यानंतर पायी चालू नका. सायकल चालवू नका.
४ अर्धा तास कोणतही शारीरिक श्रम करु नये.
५ रक्तदानावेळी वय १८ ते ६० वर्ष दरम्यान असावे.
६ एचआयव्ही, हेपाटिटिस बी किंवा सी सारखे आजार असू नये.
७ रक्त काढले जाते तेथे कोणतेही निशान किंवा घाव असू नये.
Visit : arogyanama.com