आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बदलती जीवनशैली, पाश्चात्य संस्कृतीच्या परिणामामुळे रक्ताच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. शरीरात रक्ताची गाठ होणे ही सुरुवातीला सामान्य समस्या मानली जाते. मात्र कधी कधी हा आजार मृत्यूलाही कारण ठरू शकते . रक्तवाहिन्या फुगण्यामुळे अथवा रक्ताच्या गाठीमुळे इतरही आजार बळावतात. सामन्यतः अनेकांना रक्ताच्या गाठींविषयी माहिती नसते त्यामुळे तिच्या गंभीर परिणामांची कल्पना येत नाही.
रक्ताच्या गाठींचे दुष्परिणाम –
मेंदूच्या रक्तवाहिनीत गाठ झाल्यास ‘पॅरालिलिस’चा झटका येऊ शकतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीत गाठ असल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पायांच्या नसांमध्ये गुठळी झाल्यास त्याला ‘लेग अटॅक ‘ म्हणतात. मात्र या आजारांचे वेळीच योग्य निदान झालं, तर त्याच्यावर वेळेत उपचार करता येतात.
रक्तवाहिनीत गाठी होण्याची कारणे –
जास्त वेळ उभं राहणं किंवा सातत्यानं बसून काम केल्यामुळे रक्तवाहिन्या फुगतात. त्याला ‘डीव्हीटी’ (deep venus thrombosis) म्हणतात.
रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसे घटक नसले तरीही ‘डीव्हीटी’ आजार होतो.
प्रोटीन किंवा म्युटेशन नसल्यानं रक्त गोठतं. काही रक्तवाहिन्यांमध्ये पारदर्शक घटक असतात. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळेही रक्तात गाठी निर्माण होतात.
जास्त पाणी न पिणं, डिहायड्रेशनमुळे रक्त गोठणं, एकाच स्थितीमध्ये पाय न हलवल्यास त्या व्यक्तीमध्ये पायाच्या नसांमध्ये रक्ताची गुठळी होण्याची शक्यता असते.
उपचार –
रक्ताच्या आजारांचं निदान करणं अनेकदा अशक्य होतं. काही वर्षांपूर्वी रक्तात गाठी झाल्यास रक्तपातळ करण्याची औषधं आयुष्यभर सुरू ठेवावी लागत होती. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे नवीन पद्धतींनी उपचार करणे शक्य झाले आहे.
आता ‘कॅथेटर डायरेक्टेड थ्रोम्बोलायसिस’ ने उपचार दिले जातात. जिथं गुठळी झाली आहे, त्या ठिकाणी रक्तवाहिनीला छिद्र केलं जातं. तिथून ट्यूब टाकून गाठ बाहेर काढली जाते. त्या उपचार पद्धतीला ‘कॅथेटर डायरेक्टेड थ्रोम्बोलायसिस’ म्हणतात. याशिवाय अँजिओजेट’ तंत्रज्ञानानेही उपचार करता येवू शकतात.
यामध्ये गुठळ्या होऊ नये यासाठी पोटातील सर्वाधिक मोठ्या रक्तवाहिनीत फिल्टर टाकला जातो.
काय खबरदारी घ्याल –
काम जर बैठ्या स्वरूपाचे असेल तर कामात सातत्यानं ब्रेक घ्या.
भरपूर पाणी प्या. थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहा. त्यासाठी तहान लागण्याची वाट पाहू नका.
नियमित व्यायाम करा.
चुकीची जीवनशैली बदला. आपल्या खाण्यापिण्याच्या, झोपेच्या वेळा निश्चित करा. त्यात नियमितपणा ठेवा.