आरोग्यनामा ऑनलाइन टीम : सोळा प्रमुख श्रृंगारांपैकी टिकली एक आहे. भारतीय महिला वेशभूषा केल्यावर टिकली आवर्जून लावतात. यामुळे सौंदर्यात भर पडते. हिंदू धर्मात यास सौभाग्याचे प्रतिकदेखील मानले जाते. टिकली सौंदर्यात भर घालत असली तरी तिचे आरोग्याच्या दृष्टीनेही अनेक फायदे आहेत. टिकली लावल्यानंतर कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात.
चेहऱ्याला लकव्यापासून वाचवते
टिकली लावल्याने चेहऱ्याचा लकवा येण्याची शक्यता कमी होते. कारण टिकली लावल्याने दोन्ही भुवयांच्यामध्ये ताण येतो. आयुर्वेदीक पंचकर्ममध्येसुध्दा याचा उल्लेख आहे.
ऐकण्याची शक्ती वाढते
चेहऱ्याच्या नसांमध्ये एक नस कानाच्या नसांना जोडते. त्यामुळे टिकली लावल्यास ऐकण्याची शक्ती वाढते. चक्रावर दबाव राहिल्याने ऐकण्याची शक्ती वाढते.
डोक्याला थंड ठेवते
टिकलीच्या चक्रावर हलक्या दबावाने मानसिक शांती मिळते. तसेच भिती वाटण्याची समस्या दूर होते.
शांत झोप
टिकली लावण्याने मानसिक शांतीसह शांत झोपसुध्दा लागते.
एकाग्रता वाढते
टिकली आज्ञा चक्रावर म्हणजेच दोन्ही भुवईच्या मध्ये लावली जाते. हे चक्र मनाला नियंत्रित करते. ध्यानस्त बसल्यावर याकडेच लक्ष केंद्रीत होते. मनाला एकाग्र करण्यासाठी यावर लक्ष दिले जाते. म्हणून टिकली लावल्याने एकाग्रता वाढते.
डोकेदुखी थांबते
अॅक्युप्रेशरच्या सिध्दांतानुसार, डोकेदुखीची समस्या असेल तर या चक्रावर मालिश केल्यास किंवा त्याची नस जोरात दाबल्यास रक्त वाहिन्यांचा तणाव कमी होतो आणि डोकेदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो.
डोळ्यांसाठी फायदेशीर
टिकली ज्या ठिकाणी लावली जाते ते आज्ञाचक्र डोळ्यांच्या मांसपेशी आणि त्वचेशी जोडलेले असते. हे चक्र डोळ्यांची नजर वाढवते.
सायनसपासून मिळतो आराम
आज्ञा चक्रावर दबाव टाकल्यास नाकाच्या नसचा संबंध येतो. यामुळे सायनसच्या रुग्णांसाठी टिकली लावणे फायदेशीर ठरते.
सुरकुत्या नष्ट होतात
टिकली लावणे त्वचेसाठीसुध्दा फायदेशीर आहे. आज्ञाचक्रावर दबाव टाकल्यास रक्त प्रवाहाची गती वाढते आणि त्वचा दिर्घकाळ टवटवीत राहते. सुरकुत्या पडत नाहीत.