आरोग्यनामा ऑनलाईन टीम : महिलांच्या आयुष्यात मासिक पाळीच गणित कधी चुकले नाही. मासिक पाळी म्हटले की अनेक महिलांना नको नको होते. कारण मासिक पाळीदरम्यान त्रास होतोच, तेवढा. या दिवसात पोटात दुखणे, उल्टी, ब्लीडिंग, झोप न येणे, अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या होत असतात. या कारणांमुळे त्यांच्या कामांवर परिणाम होतो. त्यात महिलांकडून अनेक अशा चुका होतात ज्या त्यांना माहितही नसतात की या चुका त्यांच्याच आरोग्यासाठी हानिकारक आहेत. यात पेनकिलर, पॅड आणि डायट अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल अनेक माहिती आपल्याला नसते. ज्याने महिला आपल्याच समस्या वाढवत असतात.
पाळीच्या दिवसात दुर्गंध घालवण्यासाठी परफ्यूमचा वापर
खुप मुली अशा असतात ज्या पाळीच्या वेळी असणारा वास कमी करण्यासाठी परफ्यूमचा वापर करतात. हे त्यांच्यासाठी नुकसानदायक असू शकते. कारण परफ्यूममुळे इंफेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. कारण त्यात अनेक केमिकल्स असतात.
पाळीच्या दिवसात पेनकिलन खाने
पाळीच्या दिवसात कंबर, पाठ, पोट, पाय अशा शरिरातील अनेक भागात दुखत असते. त्यामुळे मुली या दिवसात पेनकिलर खातात. मात्र या दिवसात पेनकिलर खाल्ल्याने शरिरातील चांगेल बॅक्टेरिया नष्ट होतात. ज्यामुळे किडनी, लीवर आणि हृदयासंदर्भातील समस्या उद्भवतात. त्यामुळे पाळीच्या दिवसात अंग दुखीवर कोणत्याही पेनकिलर खाण्यापेक्षा घरगुती उपचार करावेत.
सॅनेटरी नॅपकिन
मुली. सॅनेटरी नॅपकिनच्या वापराबाबत अधिक निष्काळजीपणा दाखवतात. एकच नॅपकिन अधिक काळ वापरतात. त्याचा परिणाम म्हणजे त्यातील बॅक्टेरिया आणि किटाणु आरोग्याला नुकसानदायक ठरू शकतात. तसंच त्याच्या जास्तवेळ वापरल्याने इंफेक्शनही होऊ शकते. त्यामुळे दिवसभरात ४-५ तासाला नॅपकिन बदलले पाहिजे.