आरोग्यनामा टीम – आपल्याला होणाऱ्या कोणत्याही आजाराच्या मागे आपल्या चुकीच्या सवयी सुद्धा असतात. खासकरुन पाइल्सची समस्या याच कारणामुळे उद्भवते. आपल्या पचनक्रियेशी या आजाराचा विशेष करुन संबंध असतो. जर पचनक्रियेत कोणत्याही प्रकारची गडबड झाली तर सर्वातआधी पोटदुखी सुरु होते, पुन्हा पुन्हा बाथरुमला जावं लागतं नैसर्गिक विधी करताना जोर लावावा लागतो आणि त्यामुळेच पाइल्सची समस्या निर्माण होते.
हा आजार एकदा बरा झाल्यावर पुन्हा होऊ शकतो. अशा वेळी पाइल्सची समस्या असलेल्या लोकांनी त्यांच्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. तर आज आपण पाइल्सची समस्या असता रुग्णाने कोणते पदार्थ खाणे टाळावे हे पाहणार आहोत. तसेच त्यापूर्वी जाणून घेऊया पाइल्स होण्याची मुख्य कारणे.
कारणे
१. पोट बिघडणं
२. एकाच स्थितीत सतत बसणे
३. जास्त वेळ उभं राहणं
४. लठ्ठपणा
५. नैसर्गिक विधीसाठी जोर लावावा लागणं
६. फायबरची कमतरता
७. आनुवांशिक कारणे
काय खाणे टाळावे
पाइल्सने पीडित असलेल्या लोकांनी फास्ट फूडला चार हात दूरच ठेवलं पाहिजे. त्याऐवजी फळं आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. पाइल्स समस्या कमी करण्यासाठी पत्तीगोबी, बीट, टोमॅटो इत्यादींचा आहारात समावेश करा.
हिरवी किंवा लाल मिरची
पाइल्सची समस्या उद्भवल्यानंतर तिखट अजिबात खाऊ नये. कारण तिखटामूळे पाइल्सच्या जखमा कमी होत नाहीत. इतकेच नाही तर पाइल्सच्या सुकलेल्या जखमा तिखटामूळे पुन्हा सक्रिय होतात. तसेच चटपटीत, मसालेदार, गरम पदार्थही खाऊ नये.
बाहेरचं खाणं टाळावे
पाइल्सने पीडित लोकांनी शक्य तेव्हढं बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. कारण बाहेरच्या पदार्थांमध्ये मिरची, तिखट, मीठ असते आणि स्वच्छतेची फार काळजीही घेतली जात नसल्याचं दिसून येत. यामुळे तुमची पाइल्सची समस्या अधिक वाढू शकते.
लक्षणे
१. शौचाच्या जागी रक्तस्त्राव होणे.
२. शौचाला आल्यानंतर आग आणि वेदना होणे.
३. शौचाच्या ठिकाणी खाज येणे.
४. शौचाच्या वेळेला मांसात भाग बाहेर येणे.