आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आयुर्वेदाच्या नियमानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्याने वात, पित्त, कफची समस्या दूर होते. तांब्यात ठेवलेल्या पाणीला ‘तांब्र जल’ म्हणूनही ओळखले जाते. तांब्याच्या भांड्याप्रमाणेच तांब्याची अंगठी घालण्याचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जाणून घ्या
तांब्याची अंगठी घालण्याचे आरोग्यदायी फायदे
पोटाचे विकार दूर करण्यास फायदेमंद
तांब्याची अंगठी घातल्याने ऑसिडिटी आणि पोटासंबंधी समस्या होत नाहीत. तांब्याची अंगठी घातल्याने शरीराच्या दुखण्यासोबतच पोटदुखीही कमी करते. याशिवाय पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी आणि पोटाचे विकार कमी करण्यासाठी लाभदायक ठरते.
रागावर नियंत्रण ठेवते
आजकाल बदलत्या लाइफस्टाइलमूळे भरपूर लोक तणावाच्या समस्येचा सामना करत असतात. या तणावामुळे ते प्रत्येक मिनिटा मिनिटाला चिडत असतात. अशावेळी तांब्याची अंगठी लाभदायक मानले जाते. शरीरातील हिट कमी करण्यासोबतच रागावरही नियंत्रण करते. तांब्याची अंगठी घातल्याने मन शांत राहते आणि रागही कमी येतो.
रक्त शुद्धीस मदत
तांब्याची अंगठी घातल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत चालते आणि तांबे रक्त शुद्ध करण्याचे कामही करते. तांब्याची अंगठी घातल्याने हे सतत शरीराच्या संपर्कात येते. यामुळे शरीराला औषधी गुण मिळतात आणि रक्त शुद्ध होण्यात मदत होते. याशिवाय रोग प्रतिकारक शक्तीही वाढते.
उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब
तांब्याची अंगठी घातल्याने रक्तदाब नियंत्रित राहते. उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी तांब्याची अंगठी घालणे फायदेमंद असते. याशिवाय तांब्याच्या अंगठीमुळे शरीरावरील सूजही कमी होण्यात मदत होते.
कॉपरची कमतरता दूर करते
तांब्याची अंगठी, कडा, किंवा ब्रेसलेट घातल्याने शरीरात कॉपरची कधीच कमतरता जाणवत नाही. तसेच त्वचेचे अनेक रोग दूर करण्यासाठी तांब्याच्या अंगठीचा चांगला फायदा होतो.