आरोग्यनामा ऑनलाइन टीम : कामाच्या ठराविक वेळा ठरलेल्या नसल्याने अनेकांच्या जेवणाची वेळ सतत बदलत असते. अशाप्रकारे वेळी अवेळी खाल्ल्याने अपचनाचा त्रास जाणवतो. अनेकदा जीवनशैली सुधारून देखील काही जणांचा अपचनाचा त्रास दूर होत नाही. मात्र, योगा केल्याने अपचनाचा त्रास कमी होतो. त्यामुळे ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांनी वज्रासन करावे. यामुळे अपचानाचा त्रास दूर होतो.
जेवणानंतर करण्यात येणारे एकमेव आसन म्हणजे वज्रासन होय. जेवणानंतर वज्रासनात बसल्याने पचन संस्थेचे कार्य सुधारते. पाचनतंत्र प्रणालीचे विकार असणाऱ्यांनी जेवणानंतर वज्रासनात बसून दिर्घ श्वास (श्वास घेताना पोट पुढे येईपर्यंत श्वास घ्यावा) असे ५० वेळा जेवणाआधी आणि जेवणानंतर करावे. हे आसन मासिक पाळीच्या समस्यांवरही उपयुक्त आहे. मेडिटेटिव्ह आसन असल्यामुळे पाठीचा कणा आपोआप सरळ होतो. ज्या व्यक्तींना गुडघेदुखीचा त्रास असतो त्यांनी वज्रासन करू नये.