आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बाजारात अनेक प्रकारच्या भाज्या येतात. या भाज्यांचे विविध प्रकारचे पराठे बनवून खाल्ल्यास अनेक फायदे होऊ शकतात. दही, चटनी, तुप आणि लोण्यासोबत हे पराठे खाल्ल्यास शरीराला ते लाभदायक आहे. कोणता पराठा खाल्ल्याने कोणते फायदे होतात याची माहिती घेवूयात.
तांदूळजाचे पराठे
तांदूळजा या भाजीमध्ये कँल्शियम आणि आयर्न असते. महिलांमधील अनियमित पिरियड्सची समस्या यामुळे दूर होते. बध्दकोष्ट दूर होते, पोटातील जंत मरतात आणि केसांचे आरोग्य सुधारते. परंतु हे जास्त प्रमाणात खाऊ नये. अन्यथ डायरिया होऊ शकतो. गरोदर महिलांनी हे खाऊ नये कारण यामुळे मिसकरेज होण्याची शक्यता असते.
कोबीचे पराठे
कोबीचे पराठे खाणे हे मानसिक शक्तीसाठी चांगले आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी असते जे मेंदूच्या विकासासाठी खुप चांगले असते. वाढत्या वयात कमकुवत स्मरणशक्तीला देखील मजबूत ठेवते.
पालक पराठे
पालक पराठे हे खूप लाभदायक आहेत. पालकामुळे डोळी निरोगी राहतात, मायग्रेन, दमा, संधिवातच्या समस्या दूर होतात.
पपईचे पराठे
पपईचे पराठे देखील करता येतात. हे खुप स्वादिष्ट असतात. पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि पपेन नावाचे तत्त्व असते. जे त्वचेतुन जुने सेल काढून नवीन सेल तयार करते आणि त्वचेला उजळ करते. त्वचेत ओलावा टिकवून ठेवते.
पनीर पराठे
पनीरचे पराठे चविष्ठ असतात. पनिर हाडे आणि दातांना मजबूत करते. पनीर खाल्ल्याने शरीरामध्ये ताकद येते आणि कंबर दुखी, जॉइंट पेन दूर होतो. पनीरमध्ये प्रोटीन असते जे वजन कमी करण्यासाठी आवश्यक असते.
मुळा पराठे
मुळ्याचे पराठे खाल्ल्याने सर्दी पडसे दूर होते. यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते जे त्वचेला तरुण ठेवण्यात मदत करते. मुळा कावीळच्या रुग्णांसाठी खुप फायदेशीर असतो.
मटार पराठे
मटार पराठे सुद्धा लाभदायक असतात. मटारमध्ये अँटीऑक्सीडेंट असतात यामुळे सुरकूत्या पडत नाहीत. बध्दकोष्ट, कँसर आणि ब्रोंकाइटिसच्या रोगांमध्ये आराम मिळतो. यामुळे ब्लड शुगर लेवल नियंत्रित राहते.