आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खाद्य पदार्थ शिजवल्याने, उकडल्याने, भाजल्याने किंवा तळल्याने त्यातील आवश्यक तत्त्व नष्ट होतात. यामुळे पचनक्रिया कमजोर होते. चांगल्या आरोग्यासाठी जेवणात कच्चा आहार घ्यावा. कच्च्या आहारात भरपूर पोषकतत्त्व असतात. यातून शरीराला भरपूर पोषण मिळते. कच्चा आहार चांगल्या प्रकारे पचवला जातो. कच्चा आहार आरोग्यासाठी कसा चांगला आहे, याची माहिती घेवूयात.
पचनक्रीया
पदार्थ तळून, भाजून किंवा शिजवून खाल्ल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात. कच्च्या आहारातील एंजाइम पचनक्रिया सुरळीत आणि मजबूत करतात. ज्यामुळे भोजन पचवण्यात मदत मिळते.
व्हिटॅमिन आणि खनिज
कच्च्या आहारात अँटीऑक्सीडेंट असते, ज्यामुळे ब्लडप्रेशरची समस्या होत नाही. याव्यतिरिक्त कच्च्या आहारात व्हिटॅमिन, खनिज, फॅटी अॅसिड आदी पोष्टीकतत्त्व योग्य प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीर निरोगी आणि मजबूत राहते.
आजार
कच्ची फळे आणि कच्च्या भाज्या खाल्ल्याने कँसर, डायबिटीज सारख्या आजारांपासून बचाव होतो. कच्चा आहार महीलांसाठी खुप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने महिलांना मासिक धर्माची समस्या होत नाही.
वृध्दावस्था
शिजवलेल्या आहाराचे शोषण करण्यासाठी शरीराचे मर्यादीत एंजाइम तेजीने प्रवाहित होतात. परंतु प्राकृतिक आहारामुळे ते शरीरात प्राकृतिक रुपात असतात यामुळे वृध्दावस्था येण्यास उशीर लागतो.
हा आहे कच्चा आहार
कच्च्या आहारात टोमॅटो, मूळा, गाजर, कांदा, काकडी, फ्लॉवर, पुदीना, कोथिंबिर, कच्चा आंबा, चिंच आदी पदार्थ खाता येतील. तसेच पालक, चना, मूळ्याचे पान हे कच्चे खाता येईल. अकुरित आहाराला कच्चा आहार मानले जाते. अंकुरीत आहार फक्त ऊर्जावान नसतो तर शरीराचा आंतरिक शुध्दिकर करुन रोगमुक्त करते. अंकुरीत आहारात प्रत्येक प्रकारची डाळीचा समावेश करता येतो.