आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेकजण वजन वाढलं की तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणं बंद करतात. परंतु , तूप खाल्यामुळेच वजन वाढतं हा समझ चुकीचा आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदे होतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो. साजूक तूपामध्ये रेटिनॉल व बेटाकेरोटीन हे घटक आहेत. हे पौष्टिक घटक डोळयांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जातात. तूप हे रक्तातील सर्वात वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते. त्यामुळे साजूक तूप आपल्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे ते जाणून घेऊया.
१) साजूक तूप खाल्याने आपली बुध्दी कुशाग्र होते.तसेच आपली त्वचा तजेलदार होते. तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते.
२) रोज शुद्ध तूप खाल्ल्याने पित्ताचा त्रास होत नाही. शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते. तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते. आणि आपली दृष्टी चांगली होते.
३) हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते. गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तूप खुप फायदेशीर ठरतं. त्यामुळे साजूक तूप तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
४) उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं. डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो. त्वचाविकार, जखमा, अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात उपयुक्त औषध आहे.
५) तुपामुळे स्वरयंत्र सुधारते आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे. शुद्ध तुपामुळे चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं. चमकदार होतो. डोके दुखत असेल तर तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत किंवा दुखर्या कपाळावर हलकेच मालीश करावे.