आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शिमला मिरचीची भाजी बहुतांश घरात आवर्जून खाल्ली जाते. शिवाय, यापासून विविध पदार्थ तयार केले जातात. शिमला मिरचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने तिचे वेगळे महत्व आहे. अनेक आजारात शिमला मिरची सेवन केली जाते. शिमला मिरचीचे कोणकोणते फायदे आहेत, हे जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे –
उर्जा वाढते
यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, विविध पोषक तत्व आणि एंटीऑक्सीडेंट्स असल्याने याची अर्धीकच्ची भाजी टॉनिक प्रमाणे असते. याचे सुप प्यायल्याने शरीरात उत्साह आणि उर्जा वाढते.
आर्थरायटिस
यात बीटा केरोटीन, ल्युटीन, जिएक्सेन्थिन आणि व्हिटॅमिन सी असते. हे नियमित खाल्ल्याने शरीरातील बीटा केरोटीन रेटिनोलमध्ये परिवर्तित होते. रेटिनोल व्हिटॅमिन ए चेच एक रूप आहे. यामुळे हृदयाच्या समस्या, ओस्टियोआर्थरायटिस, ब्रॉंकायटिस, अस्थमा या समस्यांमध्ये गुणकारी ठरते.
तणाव
यातील लायकोपिन या रसायनामुळे शारिरीक तणाव आणि डिप्रेशन सारख्या समस्या दूर होतात.
शक्ति वाढते
शिमला मिरचीच्या सेवनामुळे शारीरीक शक्ति वाढते. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, विशेष करून व्हिटॅमिन ए, बी आणि सी उपलब्ध असते. शारीराची मजबूती वाढते.
उच्च रक्तदाब
कमी करण्यासाठी शिमला मिरची फायदेशीर आहे.
वजन
वजन कमी करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यात फॅट कमी असते.
कोलेस्टेरॉल
शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. शरीराच्या मेटाबॉलिक क्रिया व्यवस्थित होते.
कमरेचा त्रास
शिमला मिरचीत केप्सायसिन रसायन असते. ही नियमित खाल्ल्याने कमरेचा त्रास, सायटिका आणि संधीवाताचा त्रास कमी होतो.