आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वयाच्या चाळिशी नंतर महिलांची सुंदरता कमी होत जाते. याचे अनेक कारण असतात. जर चाळिशी नंतर ही तुम्हाला तुमच्या सुंदरतेवर भर पाडायचे असेल तर करा या ब्युटी टिप्सचा वापर. क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइस्चराइजिंग प्रत्येक वयात गरजेचे असते. परंतु तीस वयानंतर याचे महत्त्व आजून जास्त वाढते. यामुळे त्वचेवर धूळ जमा नाही होत, आणि त्वचा नेहमी निरोगी राहते.
चाळिशीनंतर त्वचेला हायड्रेट करणे महत्त्वाचे असते. यासाठी भरपूर पाणी पिणे आणि विविध भाज्या, फळांचा सेवन करणेही गरजेचे आहे. क्रीमची निवड करताना विशेष लक्ष द्या. अशा क्रिमचा वापर करा ज्यामध्ये हायड्रेशन लेव्हल जास्त प्रमाणात आहे.
व्यायाम आणि योग केल्याने शरीर नेहमी सदृढ राहते. वयाच्या चाळिशीनंतर तर योग केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. त्याचसोबत टॉक्सिन्स सारखे घटक बाहेर टाकण्यात मदत होते . योग आणि व्यायामामुळे चेहऱ्यावरील डागही कमी होतात आणि सुरकुत्याही कमी होतात.
सनस्क्रीनचा वापर जरूर करा. यामुळे सूर्याच्या किरणांपासून होणारे समस्या दूर करता येतात. जर तुम्ही फाऊंडशनचा वापर करत असाल तर त्यामध्ये एसपीएफ क्वॉलिटी आहे की नाही याची खात्री नक्की करा.