आरोग्यनामा ऑनलाईन- कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून लोक गरम पाणी, वाफ, आयुर्वेदिक काढा असे उपाय करून खबरदारी घेत आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे करण्याचा सल्ला सुद्धा प्रथमपासूनच देण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनेक औषधी गुणधर्म असलेल्या काढ्यांचे सेवन मोठ्या प्रमाणावर लोक करत आहेत. काढ्याने शरीराला अनेक फायदे मिळत असले तरी त्याच्या अतिसेवनाचे दुष्परिणामही आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने काढ्याचे सेवन करा. काढ्याच्या अतिसेवनाचे कोणते दुष्परिणाम आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहे दुष्परिणाम
1 काढ्याचे अतिसेवन केल्यास शरीरातील उष्णता वाढते
2 एसिडिटी, छातीत जळजळं
3 हात पायांची आग होणे
4 काळी मिरी, दालचीनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या होऊ शकते.
5 गुळवेळ, अश्वगंधा यांसारख्या औषधीं वनस्पतींच्या ओव्हरडोसमुळे शारीरिक समस्या उद्भवतात.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.