आरोग्यनामाऑनलाईन- सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे काही नियम आपण पाळले पाहिजे. हे नियम पाळल्यास आरोग्य उत्तम राहते. योग गुरु बाबा रामदेव यांनी हे पाच नियम सांगितले असून यामुळे तुमचे आरोग्य उत्तम रहाते.
पहिला नियम म्हणजे सकाळी उठल्यानंतर पाणी प्यावे. बद्धकोष्ठता, सांधेदुखी, लठ्ठपणा असल्यास सकाळी गरम पाणी प्यावे. कोणतीही समस्या नसली तरी आरोग्या टीकवण्यासाठी ही सवय लाभदायक आहे. पाणी उभे राहून न पिता नेहमी बसूनच प्यावे. तसेच हळू-हळू प्यावे. पाणी प्यायल्यानंतर २० मिनिटे प्राणायाम करावे.
दुसरा नियम म्हणजे पाणी पिल्यानंतर चहा पिऊ नये. चहाची सवय बंद करावी. चहाऐवजी सकाळी आवळा-कोरफड ज्यूस किंवा गोमूत्र अर्क सेवन करावे. यामुळे काही दिवसातच शरीरात झालेले बदल दिसून येतील. सकाळी तुळस, लिंबाची पाने चावावीत.
तिसरा नियम आहे नाश्त्यासंबंधीचा. नाश्ता करताना एकसारखे पदार्थ रोज घेऊ नये. वेगवेगळ्या पदार्थांचा नाश्ता करावा. इडली-सांबर, अंकुरित धान्य, सलाद, महिन्यातून एकदा किंवा दोनदा पराठा असे पदार्थ नाश्त्यामध्ये असावेत. आठवड्यातून एक दिवस उपवास करावा, जेणेकरून पोटाला आराम मिळतो.
चौथा नियम म्हणजे स्वयंपाक वेगवेगळ्या तेलामध्ये करावा. कधी सोयाबीन तर कधी मोहरीच्या तेलामध्ये स्वयंपाक करावा. शरीराला सर्वप्रकाराच्या तेलाची आवश्यकता असते. पोळी सुद्धा गहू, मका, बाजरी, ज्वारीपासून बनवावी. मिक्स धान्याची पोळीही करता येते. महत्वाचे म्हणजे जेवताना अन्न चावून-चावून खावे.
पाचवा नियम म्हणजे रात्री दही खाऊ नये. रात्री झोपण्यापूर्वी ४ तास अगोदर जेवण करावे आणि जेवणनंतर एक तासाने पाणी प्यावे.