आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाच्या आहारात खूप मोठा बदल झाला आहे. कामाचे स्वरूपही बदलले आहे. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदरोग या आजारांचे प्रमाणा वाढत चालले आहे. शरीरात चरबीचे प्रमाण वाढण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या कारणांसह तणाव, व्यसनाधीनतेमुळे वंध्यत्वाचे प्रमाणही वाढले आहे. वंधत्वावर वेळीच आयुर्वेदिक उपचार केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केल्यास वंधत्वाची समस्या दूर करता येऊ शकते.
तसेच जंक फुड्समुळे शरीरातील फॅट्सचे प्रमाण वाढते. यामुळे वंध्यत्वाच्या समस्येशी सामना करावा लागतो. बदललेली जीवनशैली, नोकरीमधील ताणतणाव, धावपळ यामुळे तणावात वाढ होते. याचा परिणाम वंध्यत्वावर होतो. तसेच काही व्यसनांमुळेही वंधत्व येते. या सर्व कारणांचा परिणाम पुरुषांमध्ये शुक्राणू तयार न होणे, शुक्राणू नसणे, शुक्राणूंची हालचाल मंदावणे, अशा समस्या निर्माण होतात.
महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनचे असंतुलन, ट्यूबल ब्लॉक, स्त्रीबीज तयार न होणे, गर्भाशयाचे त्रास, एन्डोमेट्रियासिस यामुळे वंध्यत्व येते. वंध्यत्वासारख्या समस्येवर आयुर्वेदिक पद्धती खुप चांगली आहे. अन्य उपचार पद्धती गुंतागुंतीच्या आणि खूपच महागड्या आहेत. वंधत्वाच्या रुग्णांसाठी आयुर्वेदिक चिकित्सा हे वरदानच आहे. वंधत्वाच्या उपचारात शतावरी, अश्वगंधा, अशोक, सफेद मुसळी, कुमारी आदी वनस्पतींचा उपयोग केला जातो. पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या वाढविण्यासाठी अँलोपॅथीत विशेष औषधे नाहीत. तर आयुर्वेदात मकरध्वज, अश्वगंधा, शिलाजित यांसारख्या औषधांचा उपयोग केल्यास उत्तम प्रतीचे वीर्य तयार होते.