आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डायबिटीज असणारांनी ग्लूकोज आणि इन्सुलिनचे संतुलन ठेवणे गरजेचे आहे. यासाठी पाचक ग्रंथी चांगली राहणे जास्त महत्त्वाचे आहे. यासाठी काही आयुर्वेदिक उपाय केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय आपण जाणून घेणार आहोत.
वटवृक्षाची साल डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी आहे. हा उपाय करण्यासाठी वटवृक्षाच्या सालीला पाण्यात टाकून उकळा, हे पाणी सकाळी आणि संध्याकाळी प्या. महिनाभर हे पाणी प्यायल्यास मधुमेह मुळातून संपतो. जवसाची भाकरी खाल्ल्यानेही मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो. काळे मिरे आणि काळ्या मिठाला पाणी टाकून खडबडीत वाटून घ्यावे. याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून सकाळी-संध्याकाळी पाण्यासोबत घ्याव्यात. काही दिवसांतच रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते.
हळद पावडरमध्ये मध मिसळून रोज घेतल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. या प्रकारे कडूलिंबाच्या सालीचा काढा आणि कारल्याचा आणि आवळ्याचा रसदेखील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतो. मधुमेही रुग्णाने रोज जेवणानंतर गरम पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण घ्यावे. याशिवाय पंच साकार चूर्णासोबत जांभळाच्या बियांची पावडर गरम पाण्यासोबत प्यायल्यास फायदा होतो. जांभळाचा आणखी एक उपाय करण्यासाठी जांभळाच्या बियांचे चूर्ण, सुंठ आणि अडुळसा वाटून घ्यावा. याला कपड्याने गाळून घ्यावे. यास अॅलोवेराच्या रसात मिसळून छोट्या छोट्या गोळ्या बनवा. १-१ गोळी दिवसातून तीन वेळा मधासोबत घ्यावी.