आरोग्यनामा ऑनलाइन – आयुर्वेदानुसार सर्वांनाच भरपूर पाणी पिण्याची गरज नसते. प्रत्येकाची पाण्याची गरज वेगळी असल्याने त्यानुसार तहान लागते. दररोज किमान ५ ते ६ लिटर पाणी पिणे काहींसाठी त्रासदायक ठरू शकते. यामुळे काही समस्या सुद्धा होऊ शकतात. वात, पित्त आणि कफ या तीन दोषांच्या प्रकृतीनुसार पाणी किती प्यावे हे ठरवावे. वात आणि पित्त प्रकृती असल्यास इतरांच्या तुलनेत जास्त पाण्याची गरज असते. तर कफ प्रकृती असलेल्यांना पाण्याचे प्रमाण कमी लागते.
वातावरणही महत्वाचे
उन्हाळ्या, हिवाळा आणि पावसाळ्यात शरीराची पाण्याची आवश्यकता वेगवेगळी असते. सर्वांनाच पाणी भरपूर प्रमाणात लागत नाही. पाण्याचे शरीरातील प्रमाण हे प्रकृती आणि वातावरण यांच्यावर अवलंबून असते.
सकाळी पाणी पिणे
सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी प्यावे, असे सांगितले जाते. परंतु, प्रकृतीनुसारच सकाळी पाणी प्यायले पाहिजे.
जेवण आणि पाणी
आयुर्वेदानुसार जेवणाच्या मध्ये थोडे-थोडे पाणी प्यायल्यास प्रकृती समस्थितीत राहते. जेवणाच्या शेवटी पाणी प्यायल्यास शरीर स्थूल होते. तसेच जेवणाच्या आधी पाणी प्यायल्यास शरीर कृश होते, असे म्हटले आहे. यानुसार पाणी कधी प्यावे ते ठरवावे. तरच शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
होऊ शकतात आजार
गरजेपेक्षा जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास कफ आणि वाताचे विकार होण्याची शक्यता असते. सर्दी-पडसे, खोकला आणि घसा धरणे अशा समस्या होऊ शकतात. अधिक पाणी प्यायल्याने अंगावर सूज येऊ शकते.
ऋतूनुसार पाणी
पाणी खूप थंड किंवा खूप गरम नसावे. उन्हाळ्यात माठातील थंड पाणी प्यावे. हिवाळ्यात थोडे कोमट करून प्यावे. तर पावसाळ्यात उकळून प्यावे. उगाचच जास्त पाणी न पिता आपल्या प्रकृतीप्रमाणे पाणी प्यावे.
- आरोग्यविषयक वृत्त –
तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे - शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या
- देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी
- नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार
- काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत
- कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर
- २ रुपयांच्या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्या इतरही अमेझिंग फायदे
- ‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्ये समावेश
- रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ‘पायनॅप्पल ज्यूस’, जाणून घ्या काय आहे कारण
- लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या
- मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त
- धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या १२ संकेत