आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सतत मानसिक ताणतणाव राहिल्यास त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. यामुळे विविध शारीरीक समस्या निर्माण होतात. पित्त, कफ आणि वाताचे संतुलन बिघडणे, अॅलर्जी, दमा, रक्तातील लाल पेशींमध्ये वाढ, उच्चदाब, अशा समस्या होतात. मात्र, काही आयुर्वेदिक उपाय केल्यास तणावमुक्त होणे शक्य आहे. यासाठी कोणते उपाय करावेत, हे जाणून घेवूयात.
हे आहेत उपाय
ब्राह्मी
ब्राह्मी तणाव निर्माण करत असलेल्या लाल पेशी कमी करते. मेंदूला शांत ठेवते. एकाग्रता वाढवण्यात मदत करते.
भृंगराज
भृंगराज मेंदूला ऊर्जा देते. मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. मेंदूला शांत ठेवून पूर्ण शरीराला आराम पोहोचवतो.
जटामासी
तणाव दूर करण्यासाठी जटामासीच्या मुळांचा उपयोग होतो. यामुळे मेंदूला नवी चालना मिळते.
अश्वगंधा
याच्या सेवनाने मेंदूमध्ये नवी ऊर्जा निर्माण होते. शरीर बळकट होते.