मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – असे म्हणतात की, तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी चांगले असते. अशा पाण्याचे सेवन आपण रोज करायला हवे. नक्कीच हे खरे आहे. तांब्याच्या भांड्याचे फायदे सर्वांना माहीत आहेत. परंतु अशा काही गोष्टी आणि पदार्थ आहेत जे तांब्याच्या भांड्यात अजिबात ठेवता कामा नये. तांबं असा धातू आहे जो काही गोष्टींच्या संपर्कात आल्यास रिअॅक्शन देणं सुरु करतो. अशातच त्यात ठेवून खाल्लेल्या काही पदार्थांमुळे तुम्हाला फूड पॉइजनिंग होऊ शकतं.
त्यामुळे तांब्याचे भांडे तुमच्यासाठी हानिकारक ठरु नये त्यासाठी आम्ही तुम्हाला अशा पाच पदार्थांची माहिती देणार आहोत जे तांब्यात भांड्यात ठेवता कामा नये. चुकूनही तुम्ही असे करू नका नाहीतर तुमच्या शरीरासाठी तो पदार्थ विषासमान ठरू शकतात.
1) दूध
तांब्याच्या भांड्यात चुकूनही दूध ठेवता कामा नये. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले दूध विषारी ठरू शकते. याच्या सेवनाने तुम्हाला फूड पॉइजनिंग होऊ शकते.
2) दही
तांब्याच्या भांड्यातील दहीदेखील दूधाप्रमाणेच शरीरासाठी विषारी ठरु शकतं. दह्यातील तत्व आणि तांबं जेव्हा एकत्र येतात तेव्हा रासायनिक अभिक्रिया होते त्यामुळे फूड पॉइजनिंगचा धोका अधिक वाढतो.
3) लोणचं
तुम्हाला सांगू इच्छितो की, तांब्याच्या भांड्यात लोणचं ठेवलं तर त्यातील सिरका आणि मेटल एकत्र होतात त्यामुळे त्याच्या सेवनाने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात चुकूनही लोणचं ठेवू नका.
4) आंबट फळे
तांब्याच्या भांड्यात कोणत्याही प्रकारचे आंबट फळ ठेवता कामा नये. ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. यामुळे फूड पॉइजनिंग, उलटी, चक्कर, घबराट होणे अशा अनेक त्रासांना सामोरे जायला लागू शकते.
5) लिंबाचा रस
तांब्याच्या भांड्यात लिंबाचा रस ठेवता कामा नये. यातील अॅसिड आणि तांब्याची रासायनिक अभिक्रिया होते. त्यामुळे याच्या सेवनाने पोटदुख किंवा अॅसिडीटी होऊ शकते.