आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रात्री झोप न येणे, उठल्यानंतरही थकवा जाणवणे, शरीर जड झाल्यासारखे वाटणे, ही शरीरात व घरात विषारी पदार्थांचे प्रमाण वाढल्याची लक्षणे आहेत. यासाठी वेळीच उपाय करणे गरजेचे असते. सोनाबाथ केल्याने शरीरातून घामावाटे विषारी घटक बाहेर फेकले जातात, परंतु सोना रिजीम करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
मायक्रोवेव्हमध्ये तयार केलेले खाद्यपदार्थ खाण्याचे शक्यतो टाळावे. मायक्रोवेव्हमध्ये पदार्थांमधील प्रोटीन संरचना बदलते. जे शरीरासाठी हानिकारक असते. तसेच शरीर लवचीक ठेवण्यासाठी स्ट्रेचिंग करावे. यामुळे शरीराला बळकटी येते. बहुतांश परफ्युम, सेंटेड कॅडल्स, रुम फ्रेशनरमध्ये मोठय़ा प्रमाणात विषारी घटक असतात. यामुळे शरीराच्या त्वचेवर परिणाम होतो. सिंथेटिक रसायन असणारे वैयक्तिकसौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळावा. याच्यासाठी इतर पर्यायी वस्तूंचा वापर करावा. सौंदर्य प्रसाधने घेताना त्यामध्ये वापरलेल्या रसायनांची माहिती अवश्य घ्यावी.
घराच्या स्वच्छतेसाठी सफाई रसायनाचा वापर करताना कमीत कमी रसायनांचा वापर करावा. बेकिंग सोडा, व्हिनेगर, किंवा ऑरेंज ऑइलचा पर्याय म्हणून वापर करावा. तसेच स्वयंपाकघरात नॉनस्टिक, टेफलॉन कोटिंग आणि सिल्व्हरस्टोन केलेली भांडी वापरू नयेत. यात हानिकारक परफ्लोरोकेमिकल्स असते. हा घटक शरीरातील विषारी तत्त्वे वाढवतो. आहारात जास्तीत जास्त कच्च्या पालेभाज्या आणि फळांच्या रसाचा वापर करावा. सॅलड आणि ताज्या फळभाजांच्या ज्यूसचा अधिक वापर केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.