आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन वाढणे ही सध्या जागतिक समस्या झाली आहे. जगभरात यावर संशोधन सुरू आहे. वजन वाढण्याची अनेक कारणे आहेत. बदललेली जीवनशैली हे याचे प्रमुख कारण असले तरी काही चूकीच्या सवयीदेखील तेवढ्याच कारणीभूत असतात. अशा सवयी सोडून देणे गरजेचे आहे. साखरेच्या सेवनाने वजन वाढते, असे तज्ज्ञ सांगतात. मात्र, आपल्या आहाराचे स्वरूप पाहता गोड खाणे सोडणे शक्य होत नाही. आपल्याकडे तर मुधमेह असणारे अनेकजण कृत्रिम गोडवा म्हणजेच आर्टिफिशियल स्वीटनरचा पर्याय स्वीकारतात. यामुळे वजन वाढते.
मधुमेह नसणारे लोक साखरेच्या जागी नैसर्गिक गोडवा देणारे पदार्थ वापरू शकतात. यासाठी गूळ, मध हे चांगले पर्याय आहेत. चहा-कॉफी, मिठाईसह थंडपेय, आइस्क्रीम, स्नॅक्स, गोड मका, गोड फळांमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात साखर असते. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी अशा गोष्टींपासून दूर रहाणेच चांगले. शिवाय, मधुमेह आहे म्हणून शुगर फ्रीचा वापर करणे टाळावे. कारण शुगर फ्री म्हणजे लो-कॅलरी किंवा फॅट फ्री हे प्रत्येकवेळी खरे असेल असे नाही. आर्टिफिशियल स्वीटनर्समध्ये केमिकल असतात. याची चव गोड असली तरी ते इतर खाद्यपदार्थांमध्ये मिसळल्यावर कॅलरी आणि फॅटचे प्रमाण योग्य असेलच असे सांगता येत नाही. शुगर फ्री मिठाईसाठी वापरण्यात येणारा मावा किंवा मैदा मधुमेही रुग्णांसाठी धोकादायक असतो. त्यामुळे शुगर फ्री मिठाई खाणे सुद्धा त्रासदायक ठरू शकते.
बाजारात अनेक प्रकारचे स्वीटनर्स मिळतात. त्यांचे दूष्परिणाम अत्यंत घातक असतात. एस्पारटेम हा एक सर्वसामान्य स्वीटनर असून अनेक ब्रँड याचा वापर करतात. या स्वीटनरच्या जास्त वापराने हॅल्युसिनेशनपासून ब्रेन ट्यूमरपर्यंत अनेक आजार होण्याचा धोका असतो. तसेच सुक्रालोज या स्वीटनरचा दीर्घकाळापर्यंत वापर केल्यास लिव्हर, किडनी वाढते आणि थीमस ग्लँड आकुंचन पावते. तसेच त्वचेवर रॅशेज, भीती वाटणे, अतिसार, डोकेदुखी, पोटदुखी सारखे त्रास सुरू होतात.
स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा
रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी
दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार