आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तुम्हाला जर चहा, कॉफी बरोबर रोज बिस्कीटं,खारी,टोस्ट खायची सवय असेल किंवा नाश्त्याला झटपट होतात म्हणून ब्रेडचे पदार्थांचे सेवन करत असाल तर हा लेख खास तुमच्या साठी आहे,नक्की वाचा !
साधारणपणे ८०% बेकरी प्रॉडक्ट्स मैदा वापरून बनवलेले असतात.
केक,पेस्ट्री,ब्रेड,नानखटाई,टोस्ट,खारी,क्रीमरोल,बिस्किटे,नूडल्स,पास्ता यासारखे सगळे पदार्थ मैद्याचा वापर करून बनवलेले असतात.
मैदाचे पिठ कसे तयार केले जाते?
मैदा तयार करताना गव्हाच्या दाण्याचे कवच पूर्णपणे काढलं जातं ज्याच्यात फॉलिक ऍसिड ,व्हिटॅमिन ई ,व्हिटॅमिन बी ६,मॅग्नेशियम ,मँगॅनीज, झिंक यासारखे जीवनसत्व असतात. कवच काढल्यामुळे मैद्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू ‘शून्य’ होऊन जाते. गव्हाच्या पीठापासून ९७% फायबर वेगळे केल्यानंतर मैदा तयार करतात. मैदा नरम व पांढरा बनविण्यासाठी ऍलॉक्झनला हे अर्क वापरले जाते. कॅल्शियम परऑक्साईड, क्लोरीन डायऑक्साइड इत्यादी केमिकल्सचा वापर मैदा ब्लीच करण्यासाठी केला जातो. याच केमिकल्सचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो.
मैदापासून बनवलेल्या बहुतेक पदार्थ खूपच स्वादिष्ट असतात, पण हे प्रत्यक्षात आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात.
तर चला मग जाणून घेऊया मैद्या मुळे होणारे नुकसान.
1) मैदा लठ्ठपणा वाढवितो
जास्त प्रमाणात मैदा सेवन केल्याने शरीराचे वजन वाढून लठ्ठपणा वाढतो एवढेच नव्हे तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढून रक्तात ट्रायग्लिसराइड वाढतात. आपल्याला वजन कमी करायचे असल्यास मैदापासून बनवलेले खाद्यपदार्थ आहारातून वगळाव्या.
2) मैदा पोटासाठी हानिकारक
मैदा पोटासाठी योग्य नाही कारण त्यात फायबर नसतात व त्यामुळे मल घट्ट होतो.
3) फूड अॅलर्जी
मैद्यात ग्लूटन असल्यामुळे फूड अॅलर्जी होते. मैद्यात असलेल्या ग्लूटनामुळे खाद्यपदार्थ मऊ व चिवट बनतात याऊलट गहूत भरपूर प्रमाणात फायबर व प्रोटीन असते.
4) हाडे कमजोर होणे
मैदाचे पीठ बनवताना त्यातील फायबर पूर्णपणे नाहीसे करतात त्यामुळे असे पीठ हाड़ातील कॅलशिअम पूर्णपणे नाहीसे करते व हाडे कमजोर होतात.
5) रोग होण्याचे प्रमाण वाढते
मैदा नियामित खाल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होवून वारंवार आजारी पडण्याची शक्यता वाढते.
6) मधुमेहाचा धोका
मैदा खाल्ल्याने साखरेची पातळी लगेच वाढते कारण मैद्यात खूप उच्च ग्लाइसेमिक(glycemic) निर्देशांक असतो. म्हणून जर आपण जास्त मैदा खाल्ला तर मग आपल्याला स्वादुपिंडाची तक्रार सुरू होईल कारण ती एकदाच इंसुलिने ठीक होईल परंतु पुन्हा पुन्हा वापर करावा लागल्यास स्वादुपिंडाचे काम कमी होवून शरीरातील इन्सुलिन वाढेल आणि आपणस मधुमेह होईल.
7) संधिवात आणि हृदयरोग
जेव्हा रक्तातील साखर वाढते, तेव्हा रक्तातील ग्लुकोज गोठण्यास सुरवात होते, नंतर शरीरात रासायनिक प्रतिक्रिया होते, ज्यामुळे संधिवात आणि हृदयरोग उद्भवतो.
Dr.Gayatri S.Bodas
B.H.M.S.,D.D.H.N.
Homoeopathic Consultant,Certified Nutritionist
Dnyanada Clinic
840 Sadashiv Peth,
Pune-30.
Mob.-8983781407
Email [email protected]