आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतात नारळाचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. धार्मिक कार्यात, स्वयंपाकासाठी तसेच विविध आजारात नारळाचा वापर होतो. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्स असल्याने याच्या सेवनाने अनेक फायदे होतात. हे फायदे कोणते ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१. उलटीपासून आराम
उन्हाळ्यात उलटीसारखे वाटत असल्यास खोबऱ्याचा एक तुकडा खावा.
२. रोगप्रतिकारशक्ती वाढते
यात अँटी बॅक्टेरिअल, अँटी फंगल आणि अँटी व्हायरल तत्वामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
३. स्मरणशक्ती वाढते
खोबऱ्याच्या पेस्टमध्ये बदाम मिश्रित करुन नियमित खाल्ल्यास स्मरणशक्ती सुधारते.
४. अपचन दूर होते
ओल्या खाबऱ्याचा एक मोठा तुकडा खाऊन झोपी गेल्यास. सकाळी पोट साफ होते.
५. नाकातून रक्त येणे थांबते
उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याचा त्रास झाल्यास नारळ चांगला उपाय आहे.