आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतीय खाद्यसंस्कृतीत कांद्याला खुप महत्व आहे. कारण बहुतांश पदार्थामध्ये कांदा मोठ्याप्रमाणात वापरला जातो. महाराष्ट्रात कांद्याचे पिक मोठ्याप्रमाणात घेतले जाते. स्वयंपाक घरात कांदा विविध पदार्थ बनविण्यासाठी वापरला जातो. कांद्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्याचा औषध म्हणूनही वापर केला जातो. उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने उन्हाच्या झळांचा त्रास कमी होता. याचे अनेक आश्चर्यकारक फायदे असून त्याविषयी जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१) कांद्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. यातील अँटीऑक्सिडेंटमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.
२) त्वचेच्या आरोग्यासाठीही कांदा लाभदायक असून यातील अँटीऑक्सिडेंटमुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडत नाहीत.
३) रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विटॅमिन सी ची आवश्यकता असते. कांद्यात हे आढळत असल्याने अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण होते.
४) कांद्यातील काही सेल्समुळे इन्फेक्शन निर्माण करणारे घटक नष्ट होतात.
५) मधुमेहावरदेखील कांदा लाभदायक आहे. यात आढळणारा क्वरसटिन घटक मधुमेहासह ताण-तणाव कमी करतो.
६) पुरुषांमध्ये स्पर्मची मात्रा वाढविण्यासाठी कांदा उपयुक्त आहे.