आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पूर्वी भारतामध्ये मातीच्या किंवा पितळ्याच्या कल्हई केलेल्या भांड्यांमध्ये जेवण बनवण्याची परंपरा होती. इंग्रजांनी भारतीय कैदी आजरी पडून किंवा कॅन्सर होऊन लवकर मरावेत यासाठी तुरुंगांमध्ये अॅल्युमिनियमची भांडी वापरणे चालू केले. आज ही भांडी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आहेत. पण अॅल्युमिनीयमच्या भांड्यात बनवलेले अन्न पदार्थ आरोग्यासाठी घातक आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या भांड्यात बनवलेलं अन्नपदार्थ खाल्याने त्याचे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात ते जाणून घेऊया.
१) लिंबू, टोमॅटो यांसारखे आम्लीय पदार्थ अॅल्युमिनीयमच्या भांड्यात शिजवले, तर भांड्यातील आयन्स अन्नात लवकर विरघळतात. असे अन्न शरिरासाठी अपायकारक असते. त्यामुळे अॅल्युमिनीयमच्या भांड्यातील पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहे.
२) अॅल्युमिनीयमच्या भांड्यांवर स्टीलचा साधा चमचा जरी जोरात ओढला, तरी या धातूचे कण बाहेर पडतात. या भांड्यांत बनवलेले अन्न खाल्ल्यास धातूंचा अंश जेवणातून शरिरात जातो. प्रतिदिन अन्नातून साधारणतः ५ मिलिग्रॅमएवढे अॅल्युमिनीयम सेवन केले जाते.
३) नैराश्य, चिंता, काळजी, स्मृतीलोप, हाडांशी संबंधित आजार डोळ्यांचे विकार, मूत्रपिंडांची क्षमता घटणे, अतिसार, अतिआम्लता अपचन, पोटदुखी, आतड्याला सूज येणे वारंवार तोंड येणे, इसबसारखे त्वचारोग होतात. त्यामुळे अॅल्युमिनीयमच्या भांड्यात तयार केलेले अन्नपदार्थ खाल्याने आपल्या आरोग्यास धोका पोहचण्याची शक्यता आहे.