आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही वर्षांपूर्वी कानपुरमधील नरेश सचान या तरूणाचा चुकीच्या पद्धतीने पाणीपुरी खाताना मृत्यू झाला होतो. नरेशने खाल्लेली पाणीपुरी त्याच्या श्वासनलिकेत आडकल्याने त्याला जीव गमवावा लागल्याचे त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले होते. या घटनेवरून हेच स्पष्ट होते की, पाणीपुरी खाताना खुप सावधगिरी बाळगली पाहिजे.
आपल्याकडे पाणीपुरी ही अनेकांची आवडती डिश असते. विशेषत : महिला पाणीपुरी खाण्यासाठी नेहमीच गर्दी करतात. पाणीपुरी खाणारे कोणती जीवघेणी चूक करतात, आणि ती टाळण्यासाठी काय करायला हेव, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
कानपुरच्या नरेशने खाल्लेली पाणीपुरी त्याच्या घश्यात अडकली आणि त्याचे पाणी फुफ्फूसांमध्ये गेले. यामुळे त्यास अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला होता. घश्याच्या समस्येमुळे सुद्धा असे होऊ शकते. आंबट आणि स्पायसी खाल्ल्यामुळे घसा सुपर सेंसिटिव्ह होऊन चॉक होऊ शकतो. यामुळे श्वासनलिका चॉक होऊन मृत्यू होऊ शकतो.
करु नका या चुक
१ घाईघाईत पाणीपुरी खाऊ नका. कारण यातून मिळणारे थ्रिल जीवघेणे ठरु शकते. यामुळे पाणीपुरीचे पाणी पोटात जाण्याऐवजी फुफ्फूसांमध्ये जाते. श्वास नलिका चॉक झाल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो.
२ पाणीपुरी थेट घशाजवळ ठेवणे चांगले नसते. ती जीभेवर ठेवून हळुहळू गिळावी. लवकर-लवकर पाणीपुरी खाल्ल्याने अन्न नलिकेला इन्फेक्शन आणि साल निघण्याची समस्या होऊ शकते. यामुळे पाणीपुरी अन्य साध्या पदार्थांप्रमाणेच हळुहळू खावी.
३ काहीही खाताना श्वासनलिका बंद होते आणि अन्न नलिका उघडते. श्वास घेताना खाण्याची नलिका बंद राहते. नलीकेवर फ्लेप राहते. ही उघडते आणि बंद होते. फ्लेप ओपन राहिली तर खाल्ले जाणारे पदार्थ श्वास नलीकेत जातात आणि नलिका चॉक होते.
४ घसा खराब झाल्यावर पाणीपुरी पुर्णपणे खाऊ नये.
५ पाणीपुरी योग्य प्रकारे चावूनच गिळावी.
६ स्वच्छ ठिकाणावरील पाणीपुरी खावी.
७ खुप जास्त पाणीपुरी खाल्ल्याने गॅस्ट्रोसंबंधीत आजार होऊ शकतात.
हा आहे तोट
१ पाणीपुरी खाल्ल्याने वजन वाढते. यामध्ये हाय फॅट आणि कॅलरीज असतात. पाणीपुरी खाल्ल्याने १००० कॅलरी शरीरात जातात.
ही आहेत विविध नावे
पाणीपुरीला भारतभरात वेगवेगही नावे असून महाराष्ट्रात पाणीपुरी, हरियाणात पाणी के पतासे, उत्तर प्रदेशात पानी के बतासे आणि पतासी, वेस्ट बंगालमध्ये पुचका, उडीसामध्ये चुप चुप तर गुजरातमध्ये पकोडी म्हटले जाते