आरोग्यानामा ऑनलाइन – दररोजच्या आहारात आपण विविध प्रकारचे पदार्थ खात असतो. यापैकी काही पदार्थ शिल्लक राहिल्यास आपण ते फ्रिजमध्ये ठेवून नंतर पुन्हा गरम करून खात असतो. तर कधीकधी अन्न थंड झाले म्हणून पुन्हा गरम करून खातो. परंतु, काही पदार्थ असे असतात, जे पुन्हा गरम केल्यास त्यामध्ये काही विषारी अथवा शरीरास हानिकारक असे घटक तयार होतात. यामुळे असे पदार्थ कधीही पुन्हा गरम करून खावू नयेत. असे कोणते पदार्थ आहेत, जे एकदा तयार केल्यानंतर पुन्हा गरम करून खाऊ नयेत, याबाबतची अतिशय महत्वाची माहिती आपण घेणार आहोत. यामुळे फूड पॉयजqनगसारखी गंभीर समस्या टाळता येवू शकते.
हे आहेत ते पदार्थ
पालक
पालकामध्ये आयर्न आणि नायट्रेट जास्त असल्याने पुन्हा गरम केल्याने नायट्रेटचे विषारी तत्त्वांमध्ये रुपांतर होते. हे आरोग्यासाठी घातक आहे.
बटाटे
गरम बटाटे थंड झाल्यानंतर त्यामध्ये बॉटूलिज्म बॅक्टेरियाची वाढ होऊ लागते. यामुळे फुड पॉइजनिंगही होऊ शकते. पुन्हा-पुन्हा गरम केल्यानंतर हे बॅक्टेरिया वाढतच जातात. कितीही गरम केले तरी हा बॅक्टेरिया नाहीसा होत नाही.
चिकन
फ्रिजमध्ये ठेवलेले चिकन पुन्हा गरम केल्याने यातील प्रोटीनचे कम्पोजिशन बदलू शकते. हे खाल्ल्यानंतर पचनाची समस्या होते. इन-डायजेशनची समस्या होते.
अंडे
अंडी पुन्हा गरम करु नयेत. उच्च तापमान असलेली अंडी पुन्हा गरम केल्याने ते टॉक्सिक होतात. याचा वाईट परिणाम पचन क्रियेवर होतो.
बीट
बीटमध्ये नायट्रेट असल्याने बीट पुन्हा गरम केल्यास त्यामध्ये विषारी तत्व तयार होतात. बीटची भाजी उरली तर ती गरम करण्यापेक्षा थंडच खावी.
तेल
तेल पुन्हा गरम केल्याने त्यामध्ये अलदेहाईड्स नावाचे रसायन तयार होते. ते टॉक्सिक असते. सोयाबीन आणि सनफ्लावर ऑइलचेसुध्दा असेच होते. या रसायनामुळे न्यूरो संबंधित रोग आणि कँसर होण्याची शक्यता असते.
मशरुम
यातील प्रोटीन कम्पोजिशन खुप जटिल असल्याने एकदा जेवढे मशरुम खायचे असेल तेवढेत तयार करावे. पुन्हा गरम केल्याने यामध्ये प्रोटीन एका वेगळ्यात तत्त्वात बदले यामुळे अपचन होऊ शकते.