आरोग्यानामा ऑनलाईन टीम : शरीरात विषारी घटकांचे प्रमाण वाढले की आपोआपच धोक्याची घंटा वाजू लागते. विविध आजार शरीरात प्रवेश करतात. हे विषारी घटक बाहेर पडण्यासाठी काही खास आणि सोपे घरगुती उपाय असून त्यापैकी एक उपाय म्हणजे नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे होय. या उपायामुळे कोणते फायदे होतात, ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ तांब्याच्या भांड्यात कमीत कमी ८ तास ठेवलेले पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. पचनक्रिया सुधारते.
२ रक्ताची कमतरता दूर होते. अॅनिमिया रोगाचा धोकादेखील टळतो.
३ सांधेदुखीचा त्रास कमी होतो व शरीरास आराम मिळतो.
४ कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी झाल्याने हृदयरोग होत नाहीत.
५ याच्या अॅन्टी-बॅक्टेरिअल गुणामुळे जखमा लवकर भरुन येतात.
६ यातील कॉपर थायरॉक्सिन हार्मोन्सला संतुलित ठेवते. यामुळे थायरॉइडचाही धोका दूर होतो.
७ यातील अँटी-ऑक्सिडेंट्समुळे कर्करोगाविरोधात लढण्याची क्षमता वाढते.
८ पित्त, गॅस किंवा पोटाचे कोणतेही विकार झाल्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.
Visit : arogyanama.com