आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सततची धावपळ, विश्रांतीचा अभाव, आयुष्यात आलेला एकसुरीपणा, यामुळे नकळत तुमच्यावर काही वाईट परिणाम होत असतात. अनेकांना रिलॅक्स होण्यास वेळच मिळत नाही. धावपळीचे हे जीवन आपल्याला पार बदलून टाकते. अशावेळी एका ब्रेकची नितांत गरज असते. या ब्रेकची गरज कधी असू शकते, याचे संकेत आपण जाणून घेणार आहोत..
हे आहेत संकेत
१ सतत आजारी पडणे, सतत काही ना काही त्रास होणे, असे आढळून आल्यास तुम्हाला नक्कीच एका ब्रेकची गरज आहे, हे ओळखा.
२ सर्व सुरळीत असतानाही कामात मन न लागणे, हादेखील संकेत सांगतो की, तुम्हाला एका ब्रेकची गरज आहे.
३ घरातील सदस्यांशी सतत भांडणे, चिडचिड, छोट्या-छोट्या गोष्टींवरून बिनसणे, असे प्रकार घडत असतील तर तुम्हाला ब्रेकची गरज आहे. यासाठी दोन चार दिवस कुठेतरी फिरुन या.
४ सुट्टी असतानाही विनाकारण संताप, चिडचिड होणे, हा ब्रेकची गरज असल्याचा संकेत आहे. यासाठी शांत व्हा. आपले काय चुकतेय याचा विचार करा.
५ सततच्या कामाच्या ओझ्यामुळे एका ठराविक काळानंतर चिडचिड, संताप, कंटाळा येतो. यातून सुटका मिळवण्यासाठी एक मोठा ब्रेक आवश्य घ्या.
६ जीवनात एकसुरीपणा आल्याने बोरींग वाटायला लागते. एकांगीपणा आल्यावर असे होऊ शकते. अशावेळी ब्रेकची गरज आहे असे समजा.
७ आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्यातील बदल प्रथम जाणवतो. त्यांनी याबाबत काही सल्ला दिल्यास तो ऐका आणि विचार करा. तुमच्या स्वभावात, कृतीत काही बदल झाला असल्यास कामातून सुट्टी घेऊन एक मोठा ब्रेक घ्या.
Visit : arogyanama.com