आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ज्यांची स्मरणशक्ती चांगली तेच जीवनात चांगले यश मिळवू शकतात. स्पर्धेच्या युगात तर स्मरणशक्तीला खूप महत्व आहे. मुलांची बुद्धी तल्लख व्हावी म्हणून पालक विविध उपाय करत असतात. एवढेच नव्हे तर मोठ्यांना सुद्धा बुद्धीची अनेक कामे करावी लागतात. बुध्दी वाढविण्यासाठी काही नैसर्गिक उपाय असून हे उपाय केल्यास बुद्धी तल्लख होऊ शकते.
दालचिनी
रात्री झोपण्यापूर्वी दालचिनीची चिमूटभर पावडर मधात मिसळून खाल्ल्यास मानसिक ताण दूर होतो. स्मरण शक्तीसुद्धा वाढते.
जटामांसी
आयुर्वेदात जटामांसीचे अनेक फायदे सांगितले आहेत. मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी ती रामबाण उपाय आहे. रोज १ कप गरम दुधात १ चमचा जटामांसी मिसळवून ते प्यायले तर खूप फायदा होतो.
हळद
कॅलिफोर्निया विद्यापीठातील एका संशोधनानुसार, हळदीमध्ये कुरकुमीन नावाचे एक रसायन असते. त्यामुळे मेंदूच्या निष्क्रिय पेशी सक्रिय होतात.
शंखपुष्पी
३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधाबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरणशक्ती वाढते. शंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ ग्रॅम पूड मुलांना दिल्यास बुद्धिमान होतात. सकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढवा. शुद्ध रस १०-२० मिलीग्रॅम किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपर्यंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
तुळस
तुळशींच्या पानांनी मस्तिष्क आणि हृदयातील रक्तप्रवाह सुरळीत होतो.
ब्रह्मी
बुद्धीला तल्लख करणारी ही सर्वोत्तम औषधी असून तिच्या नियमित सेवणाने स्मरणशक्ती वाढते.
केसर
केसरचा वापर केल्याने बुद्धी तल्लख होते.