आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चांगल्या आरोग्यासाठी आहार खुप महत्वाचा असतो. केवळ जीमला जावून आरोग्य चांगले राहू शकत नाही. त्यासाठी योग्य आहारही तितकाच गरजेचा असतो. योग्य आहार न घेतल्यास तुम्ही सतत आजारी पडू शकता. योग्य आहार जेवढा महत्वाचा आहे तेवढेच कोणते पदार्थ कोणत्या वेळी खावेत यासही खुप महत्व आहे. चुकीच्या वेळी एखादा पदार्थ खाल्ल्यास त्याचा त्रासही होऊ शकतो. कोणते पदार्थ खाण्यासाठी कोणती वेळ योग्य असते, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
यावेळी खा हे पदार्थ
१ साखर सकाळी खा. रात्री खावू नका.
२ सफरचंद सकाळी खा. संध्याकाळी आणि रात्री खावू नका.
३ भात दुपारी खा. रात्री खावू नका.
४ डाळ आणि शेंगा सकाळी खावू नका. रात्री खा.
५ दही दुपारी खा. रात्री खावू नका.
६ दुध रात्री प्या. सकाळी पिऊ नका.