आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधीय गुणधर्म असून आयुर्वेदातही तुळशीला खूप महत्व आहे. पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात. म्हणून पावसाळ्या दररोज तुळशीचे चार-पाच पाने खाल्यास सर्दी, ताप, खोकला या आजारांपासून बचाव होतो. तसेच तोंडाचे आजारही दूर होतात.
सकाळी पाण्यामध्ये तुळशीचे पाने टाकून ते पाणी पिल्यास संसर्गजन्य आजार होत नाहीत.
डाग, खाज आणि त्वचेच्या आजारांत तुळशीच्या पानांचा अर्क त्या ठिकाणी लावल्यास काही दिवसात त्वचारोग दूर होतो.
महिलांनी मासिक पाळीत पोट किंवा कंबरदुखीमध्ये एक चमचा तुळशीचा रस घ्यावा तसेच तुळशीची चार-पाच पाने चावून-चावून खाल्यास त्रास दूर होतो. तुळसीच्या मुळांचा काढा तापनाशक आहे. तुळस, आले वाटून मधासोबत घेतल्यास सर्दी आणि ताप या आजारात आराम मिळतो.