आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आजकालच्या धावपळीच्या जगात लोक आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. थोडं काम केल्यानं लगेच त्यांना थकवा जाणवतो. याचं मोठं कारण म्हणजे रक्ताची कमतरता असू शकतं. यासाठी काही पदार्थांचा डाएटमध्ये समावेश कराल तर रक्ताची कमी भरून निघू शकते.
1) पालक – आयरन, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक अॅसिडनं भरपूर पालक रक्ताची कमतरता दूर करतं. दिवसभरात पालकचं सूप पिल्यानं कमजोरी दूर होते. सूपऐवजी तुम्ही पालकचा ज्यूसही पिऊ शकता. परंतु साखरेऐवजी मधाचा वापर करा. एका महिन्यातच तुम्हाला फरक जाणवेल.
2) बीट- बीटमध्ये आयरन, फायबर, कॅल्शियम आदी तत्व भरपूर असतात. यासाठी बीट आणि गाजरचा रस प्या. तुम्ही सलाड किंवा भाजीच्या स्वरुपातही याचं सेवन करू शकता. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी हा एक चांगला स्रोत आहे.
3) डाळिंब- डाळिंब चवीसह आरोग्याचा खजिना आहे. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी डाळिबांचा ज्यूस फायदेशीर ठरतो. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये एक चतुर्थांश दालचिनी पावडर आणि दोन चमचा मध मिसळून नाश्यात रोज सेवन करा.
4) खजूर- खजूर आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी खजूर दुधात भिजायला घाला. सकाळी उपाशी पोटी याचे सेवन करा. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी हा खूप सोपा उपाय आहे.
Visit : arogyanama.com