आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काजू व मनुका शक्तविर्धक ड्रायफ्रुट्स असून दररोज चार काजू आणि आठ मनुका खाल्याने अनेक आजार झटपट बरे होतात. आयुर्वेदातही काजू आणि मनुकाचे महत्त्व सांगितले गेले आहे. हे ड्रायफ्रुट्स सुदृढ शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात. यांच्या सेवनाने शरीरात ऊर्जा निर्माण होते. तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
मनुकामध्ये बोरोन नामक मायक्रो न्यूट्रियंट असल्याने ते हाडांमधील कॅल्शियम कमी होऊ देत नाही. बोरोनमुळे ऑक्स्टियोप्रोसिसला फायदा होतो. गुडघेदुखीचा आजारही बरा होतो. मनुकामध्ये अधिक प्रमारात आयरन आढळतात. तसेच त्यात बी विटामिन असल्यामुळे रक्तवाढीसाठी लाभ होतो. मनुकात आढणारे फिनॉलिक पायथोन्यूट्रियंट, एंटी बॉयटिक आणि एंटी ऑक्सिडेंट तत्त्वांमुळे ताप झटपट उतरतो. तसेच बॅक्टीरिअर इंफेक्शन तसेच अन्य आजारही बरे होतात.
काजूला ऊर्जेचा स्त्रोत म्हटले जाते. काजू नियमित सेवन केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. शरीरिक तसेच मानसिक थकवा जाणवत नाही. वजन वाढीसाठी काजू हे रामबाण औषध आहे. काजूमध्ये फ्रकटोज आणि ग्लूकोज आढळतात. त्यामुळे दररोज चार काजू सेवन केल्याने शरीराला उर्जा मिळते. काजूमध्ये प्रोटिन्स अधिक प्रमाणात आढळतात. काजू दररोज खाल्याने हाडे मजबूत होतात. काजूमुळे दात आणि हिरड्याही सशक्त राहतात. तसेच ह्दयविकारावरही काजूही रामबाण औषण सिद्ध झाले आहे. काजूमध्ये एंटी ऑक्सिडेंट असल्याने शरीराचे वजन संतुलित ठेवले जाते.