आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात वातावरण बदलल्यामुळे अनेक लोकांना ताप येतो. अशा तापावर मेडिकलमधून आणलेली गोळी घेण्यापेक्षा विविध घरगुती औषधी घेणे योग्य ठरते. ताप दूर करण्याचे काही सोपे उपाय आपल्या किचनमध्ये उपलब्ध असतात. अशाच ११ सोप्या उपायांनी ताप दूर करता येईल.
१ एका ग्लासात ३ ते ४ काळेमिरे, १-१ चमचा आद्रक आणि तुळशीची पाने टाकून उकळून घ्या. कोमट झाल्यानंतर हे पाणी गाळून प्या. लवकर आराम पडले.
२ पुदीना आणि आद्रक मिसळून काढा तयार करा. हे कोमट झाल्यानंतर हळूहळू प्या. या उपायाने लवकरच ताप उतरेल.
३ तुळस, मुलेठी, मध आणि साखर उकळून घ्या. थंड झाल्यानंतर गाळून प्यायल्यास ताप उतरतो.
४ मध, आद्रक आणि तुळशीच्या पानांचा रस सकाळ-संध्याकाळ घेतल्यास ताप उतरतो.
५ आठ मिरे, १० तुळशीची पाने, थोडे आद्रक आणि दालचिनी पाण्यात उकळून घ्या. कोमट झाल्यानंतर हे पाणी प्या, आराम मिळेल.
६ तुळस आणि सुर्यफुलाच्या पानांचा रस प्यायल्यास टायफॉईडच्या तापात चांगला आराम पडतो.
७ रोज सकाळी कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. यामुळे ताप उतरतो.
८ पाच-सहा लसणाच्या पाकळ्या तुपात गरम करून सैंधे मीठ टाकून खा. ताप लवकर उतरतो.
९ गार पाण्यात कपडा भिजवून डोक्यावर पाच ते दहा मिनिटे ठेवा. ताप तात्काळ उतरतो.
१० सकाळ-संध्याकाळ कांद्याचा रस प्यायल्याने ताप लगेच उतरतो. शिवाय डायजेशनही चांगले होते.
११ दोन-तीन लसूण पाकळ्या एक कप पाण्यात उकळून हे पाणी कोमट झाल्यावर प्या. यामुळे सर्दी, ताप दूर होतो.